कृषी विभागाने लाज सोडली! आंबा बागेसाठी १४ लाखांचा खर्च, उंबरठे झिजवूनही अनुदान नाही! इसरुळच्या शेतकऱ्याने बागेवर फिरवला नांगर ...
प्रशासनाकडे तक्रार, उत्तर मात्र उशिरा
अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही काहीच परिणाम न झाल्याने अखेर भुतेकर यांनी पत्नीच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही तब्बल १५ दिवसांनी कृषी विभागाने लेखी उत्तर देत केवळ कागदी प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप आहे.
उत्तरात ई-मस्टर तयार करण्यासाठी नमुना ४ अंतर्गत मागणी, आधार-लिंक असलेली बँक खाती व मजुरांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र दोन वर्षांपासून ही प्रक्रिया का पूर्ण करून घेतली गेली नाही, यावर मात्र प्रशासनाकडे उत्तर नाही.
‘तांत्रिक अडचणी’चा बाऊ जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे..
मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की, योजना राबविताना शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कोणाची?
शेतकरी आत्महत्येचा इशारा देतो, तरीही प्रशासन जागे का होत नाही?
की ‘शेतकरी हित’ ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे?
मोठ्या मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट करण्याइतकी वेळ शेतकऱ्यावर येत असेल, तर हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर शासनाच्या कृषी धोरणांवरचे मोठे प्रश्नचिन्ह आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप असून शेतकरी संघटना व विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे.
