सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भूमिपुत्र आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू – अक्षय पाटील..!
Jul 28, 2025, 18:56 IST
जळगाव जा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेकडो भूमिपूत्रांनी २८ जुलै रोजी तहसील कार्यालय, जळगाव जामोद येथे युवा नेते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. जळगाव जामाेद तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असून, दररोज ८ ते ९ शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे भयावह वास्तव आहे. तरीही सरकार सरसकट कर्जमाफी का करत असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करत त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच २०२३-२४ सालाचा उर्वरित पीक विमा मिळावा, यासाठी जिल्हाभरात अनेक आंदोलने झाली, तरीही हजारो शेतकरी अद्याप पीकविम्यापासून वंचित आहेत. या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वितरित करावा. २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली असली, तरी अजूनही काही शेतकऱ्यांना ती मदत मिळालेली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यावर्षी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. हे संकट लक्षात घेऊन शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणीही यावेळी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पवन पाटील यांना निवेदन देण्यात आले.या आंदाेलनात शिवदास खिरोडकर, अनिल सिंह राजपूत, सदाशिव गवई, समाधान गवई, भाऊजी पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, सोपान पाटील, सदाशिव जाणे, पप्पू पोटे, मोहन चांभारे, त्रिलोकसिंह राजपूत, फारुख शेख, संतोष गणगे, विठ्ठल खंडेराव, अनंता मारोडे, संदीप वाघ, रवींद्र निर्मळ, गौतम तायडे, आदर्श निंबाळकर, सतीश निंबाळकर, सागर गवळी, गजानन ढगे, रिजवान काझी, श्रीकृष्ण गवळी, ज्ञानेश्वर जाणे, विजय निलजे, गजानन अढाव, रवी भालतडक, आदित्य भालतडक, भिकाजी वानखडे, विजय महाले, सुनील पाटील, विनोद गवई, विकास गवई, विष्णू गवळी, सागर लादे, दिलीप राऊत, रामकृष्ण लादे, राजेंद्र राखोंडे, ज्ञानेश्वर चोपडे, ज्वालासिंग राजपूत, ज्ञानेश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर पिसे, अरविंद जाधव, अनिल म्हसाळ, दीपक आकोटकर, रघुनाथ भोंडे, बाळू घुळे, निलेश खिरोडकर, प्रज्वल वानखडे, सखाराम पाटील, अमर पाटील, संजय पाटील, राजूभाऊ नितवणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.