‘लाडकी बहीण’ योजनेचा अनाथ, निराधार, बेघर बालकांना फटका; गेल्या आठ महिन्यांपासून अनाथ, निराधार, बेघर बालके लाभापासून वंचित...
यामुळे विशेषतः एकल पालक व पालकविहीन बालकांच्या संगोपनामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून संबंधित पालक व संरक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुनर्प्राप्तीसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी व्यापक मागणी होत आहे.
दरमहिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी विविध विभागाचा निधी वळती करण्यात येत आहे. त्याचा फटका समाज कल्याण विभागासह इतर विभागांच्या योजनांना बसत आहे. या योजनेचा फटका आता अनाथ, निराधार, बेघर बालकांनाही बसत असल्याचे चित्र आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जिल्ह्रयात 6 हजार 54 पात्र बालके आहेत. या बालकांना शासनाकडून मान्यता मिळालेल्या 12 संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. एकल पालक तथा निराधार बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये,यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
अमोल डिघोळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,बुलढाणा
