दयावान अन् विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे काशिनाथ आप्पा बोंद्रे! प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे प्रतिपादन; म्हणाले,महाविकास आघाडीच्या हाती नगरपालिकेची सत्ता द्या, कायापालट करून दाखवू....
शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी स्पष्ट आणि ठोस दृष्टी मांडली आहे. रस्ते, नाली, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुशोभिकरण, डिजिटल सुविधा, तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकास या क्षेत्रात आधुनिक आणि व्यावहारिक उपाय सुचवून आप्पांनी विकास हा वचन नव्हे तर कृती,असा संदेश दिला आहे. शहराला भविष्यातील गरजांशी जुळवून आधुनिक सुविधा देत प्रगत चिखली घडवण्याचा त्यांचा रोडमॅप लोकांमध्ये उत्साह निर्माण करतो.
काशिनाथ आप्पा यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका
काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभाराची हमी आणि पक्षपाताशिवाय सर्वांसाठी काम करण्याची भूमिका यामुळे चिखलीकरांमध्ये त्यांच्याबद्दल अधिक विश्वास निर्माण होत आहे. सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य, आणि सौहार्द जपण्याची त्यांची भूमिका शहरातील सर्व समाजघटकांना जवळ घेणारी ठरत आहे. शहरातील तरुणांमध्येही आप्पांविषयी आकर्षण आहे. रोजगाराच्या संधी, उद्योजकतेला चालना, डिजिटल सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून चिखलीला पुढील टप्प्यावर नेण्याची त्यांची तयारी तरुणांमध्ये आशावाद निर्माण करणारी आहे.
