‘हर घर तिरंगा’ मोहिम; जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन! सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन....
जाहिरात...👆
पहिल्या टप्यात 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट. हर घर तिरंगा 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडीयावर फोटो शेअर करणे, तिरंगा रांगोळी स्पर्धा-कार्यशाळा, तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा, अंगणवाडी, शाळा, वृध्दाश्रम, मॉल्स यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजूषा, शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम, ‘हर घर तिरंगा - हर घर स्वच्छता’ अभियान हे 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवून स्वच्छता व पाणी संजीवनीवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वयंसेवक कार्यक्रमात प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोचवणे व जनजागृती करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तिरंगा महोत्सव, तिरंगा मेला व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली, तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या, तिरंगा विक्री स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटांचा सहभाग, मिडीया व सोशल मिडीयात हॅशटॅगसह प्रसिद्धी-प्रचार, प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घर, कार्यालय, वाहनावर तिंरगा फडकावणे, सेल्फी व फोटो harghartiranga.com वर अपलोड करणे, ध्वजारोहण समारंभ, कार्यक्रामाचे प्रसारण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.