शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी! पिक विम्याची १४.२४ काेटींची भरपाई मंजूर; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; ६ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार पैसे!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२०२५ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १४ कोटी २४ लाख ११ हजार २३१ रुपये मंजुर झाले आहे. आजपासुन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैशे जमा व्हायला सुरुवातही झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजुर झाली आहे. या खरीप हंगामातील उर्वरीत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्यात मिळणार आहे. 
 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या खरीप हंगामातील पिक विम्याचे १४ कोटी २४ लाख ११ हजार २३१ रुपये मंजुर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासुन पिकविम्याचे पैशे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हयातील अनेक शेतकरी सन २०२४-२५ च्या खरीप हंगामातील पिक विम्यापासुन वंचीत राहीले होते.केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहीजे,असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सन २०२४-२५ खरीप हंगामातील ६ हजार ६०७ शेतकऱ्यांना १४ कोटी २४ लाख ११ हजार २३१ रुपये मंजुर झाले आहेत. याशिवाय सन २०२४-२५ खरीप हंगामातील जिल्हयातील अनेक दावे अजुनही प्रलंबित आहेत. या प्रलंबित दाव्यासंदर्भात कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असुन ही प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहीती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे.