आमदार श्वेताताईंनी पीक विमा नुकसान भरपाईचे क्षेत्र वाढवून घेतले! शेतकरी संघटनेचे नेते समाधान कणखर यांचे प्रतिपादन; तुपकरांच्या एल्गार मोर्चाला म्हणाले नौटंकी..

 
kjghb
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे मात्र योग्य माहिती नसल्याने नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांनी  ७२ तासांच्या आत नुकसानीचा दावा केला नाही. त्यामुळे विमा मिळवण्यासाठी पात्र असूनही  शेतकरी नुकसान भरपाई साठी पात्र ठरू शकत नव्हते. परंतु आमदार श्वेताताईंनी जास्तीत जास्त शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले पाहिजे असा आग्रह धरला, त्यासाठी पीक विमा कंपनीला बाध्य केले. त्यामुळे पीक विमा कंपनीने जास्तीत जास्त शेतकरी पात्रतेच्या यादीत घेतल्याने जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते समाधान कणखर यांनी केले. अमडापूर येथे २ कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिट कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार श्वेताताईंच्या हस्ते पार पडला, यावेळी झालेल्या कार्यक्रमात कणखर बोलत होते.

thakre

      ( जाहिरात👆🏻 )

 केंद्र सरकारने तेल बियांवरील स्टॉक लिमिट हटवल्याने सोयाबीनचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे.हे कुठल्या मोर्चाने झाले नाही. मात्र काही लोक झालेली भाववाढ एल्गार मोर्चाने होत असल्याच्या वल्गना करीत आहेत. भाववाढ हे मोदी सरकारचे यश असून एल्गार मोर्चा म्हणजे नौटंकी असल्याची टीका यावेळी कणखर यांनी केली.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एनडीआरएफ च्या निकषात तीन पट वाढ  केली. तसेच नुकसान भरपाई साठी दोन हेक्टर वरून तीन हेक्टरची मर्यादा वाढवली. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी राज्यातील अनेक शेतकरी पात्र होणार असल्याचे कणखर म्हणाले. 

 अमडापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करणार..
   अमडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. परंतु चौकाचे सौंदर्यीकरण झालेले नाही. मागच्या काही लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली मात्र सौंदर्यीकरणाचे काम केले नाही. मात्र आता आमदार निधीतून या चौकाचे सौंदर्यीकरण करणार असल्याची घोषणा आमदार श्वेताताईंनी यावेळी केली. या कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख यांच्यासह गावातील नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.