लोणार तालुक्यातील भुमराळ्यात शेतकऱ्याचा खून! गळा दाबला! भांडण सोडवायला मध्ये जाणे पडले महागात..

मृतक शेतकऱ्याच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार काल, दुपारी २ च्या सुमारास त्यांच्या चुलत दिर गणेश चिंतामण चव्हाण(२३) याला मोबाईल वर मॅसेज पाठवल्याच्या कारणावरून नितीन अशोक कहाळे, सीमा अशोक कहाळे( दोघे रा.रुम्हणा,ता. सिंदखेडराजा) व दिलीप काळे, मंगल दिलीप काळे, भारत दिलीप काळे ( तिघे रा.शेवली,ता. मंठा, जि.जालना) हे मारहाण करीत होते.त्यावेळी चुलत भावाला वाचवण्यासाठी भानुदास चव्हाण भांडण सोडवायला मध्ये गेले,पोरांना मारू नका असे ते म्हणत होते. मात्र मारेकऱ्यांनी यावेळी भानुदास चव्हाण यांनाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने ते खाली कोसळले. भारत काळे याने भानुदास चव्हाण यांचा गळा दाबला त्यामुळे त्यांच्या नाका तोंडातून रक्त आले, तोंडातून जेवणाच्या उलट्या झाल्या. त्यामुळे भानुदास चव्हाण यांना तातडीने बिबी येथील रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.