मोठी बातमी! उद्या चिखली शहर बंद चे आवाहन; राधिकाच्या मारेकऱ्यांना पकडा अन् फाशी द्या..

 
radhika
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ६ वर्षीय राधिका विलास इंगळे या चिमुकलीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. तिचा मृतदेह दिसू नये म्हणून तिच्या मृतदेहावर दगडाची पाळ रचली, समाजमन सुन्न करणारी ही घटना काल,१३ मे रोजी चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान परिसरात उघडकीस आली. पोलिसांची विविध पथके राधिकाच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान समाजमनाला हादरवरून सोडणाऱ्या या घटनेने प्रचंड सतांपाची लाट उसळली आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडा अन् फाशी द्या अशी एकमुखी मागणी आता सामाजिक स्थरावरून होऊ लागली आहे. या घटनेच्या निषेधार्थ  कपिल खेडेकर यांनी उद्या,१५ मे रोजी चिखली शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
 

राधिका वर जो प्रसंग ओढवला असा दुर्दैवी प्रसंग कुणावरही येऊ नये. या घटनेकडे शासन , प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कपिल खेडेकर यांनी म्हटले आहे.  राधिकाच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा, मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे असेही खेडेकर यांनी म्हटले आहे. १५ मे रोजी व्यापारी, नागरिक, छोट्या दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा असे आवाहन खेडेकर यांनी केले आहे.