चिखलीत "त्या" रात्री झालेली घटना नियोजन पुर्वक, सैलानी नगरात एकाच्या घरात गुप्त बैठक झाली! स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले मात्र दंगाकाबू पथकातील "एका"ने जाणूनबुजून हिंदूंना टार्गेट केल्याचा आरोप!

चिखलीच्या विश्रामगृहावर सर्वपक्षीय एकवटले; देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार..
 
Gbbc
चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  १६ मे च्या रात्री चिखलीच्या सैलानी नगर परिसरात दोन गटात राडा झाला. लग्नात डीजे वर वाजत असलेल्या गाण्यावरून दोन गट आमने सामने आले. या वादाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाल्याने बाचाबाची वाढत गेली, काही वेळाने एका विशिष्ट समाजाने लग्नातून परत जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गट हातात लाठ्या,काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. पोलिसांनी दंगाकाबू पथकाला पाचारण केले, लाठीमार केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.  मात्र या प्रकारात शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप यांना मारहाण झाली, ही मारहाण मनात खुन्नस ठेवून केल्याचा आरोप खासदार प्रतापराव जाधवांनी केला. दरम्यान या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आज,१९ मेच्या सकाळी चिखलीच्या विश्राम गृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. विविध हिंदुत्ववादी संघटनांसह प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 १६ मेच्या रात्री घडविण्यात आलेला राडा नियोजन पूर्वक होता. सैलानी नगरातील एकाच्या घरात एक गुप्त बैठक झाली, त्या बैठकीला विशिष्ट समाजाने लोक उपस्थित होते. सदानंद नगरातील तरुणांना घरातून काढण्यात मारण्यात आले. सैलानी नगरात राहणारा एक कर्मचारी दंगाकाबू पथकात होता, त्याने हिंदू तरुणांना जाणून बुजून मारहाण केली असे निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आले. देशद्रोही घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यासह कारवाई करताना भेदभाव करणाऱ्या दंगा काबू पथकातील पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी  देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, माजी नगरसेवक निलेश अंजनकर, नगरसेवक सुभाष आप्पा मंगरूळकर,सुदर्शन खरात, काँग्रेसचे अँड.प्रशांत देशमुख, भाजयुमो शहराध्यक्ष सागर पुरोहित, यांच्या 
सह चिखली शहरातील सामाजिक क्षेत्रातील मंडळीसह हिंदू बांधवांची उपस्थिती होती.