आभाळ फाटलं! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रुईखेड मायंबा येथील घटना

 
jughj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे वित्तहानी सह जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. बुलडाणा तालुक्यातील  रुईखेड मायंबा येथे वीज कोसळून ५७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल, २० ऑक्टोबरला घडली.
 देवराव देवबा सोनुने हे गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते. संध्याकाळी ६ पर्यंत ते घरी परतले नाहीत, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता शेतातील एक झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळला.  त्यांच्या शेजारी एक गायसुद्धा मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान सायंकाळच्या सुमारास  कोसळलेल्या विजेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.