प्रेमविवाह केलेल्या गरोदर मुलीचे माहेरच्यांनीच तोंड दाबून केले अपहरण; जावयाला सैराट करण्याची धमकी! पती पोलिसांना हात जोडून थकला!
नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद येथील मोहन गजानन शेंडगे(३१) याचे खामगाव शहरातील गुंताबाई नगर , घाटपुरी परिसरात राहत असलेल्या नात्यातीलच २० वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरच्यांच्या या लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी भोपाळ येथे पळून जात नोंदणी विवाह केला. त्यानंतर मोहन पत्नीला घेऊन घरी मोमिनाबाद येथे राहू लागला. दरम्यान ती गरोदर राहिली..इकडे मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिचे आईवडिल संतप्त झाले होते. मुलीच्या वडिलांनी तीन वेळेस मोमिनाबाद येथे येऊन मुलीला घरी चलायला सांगितले..हे लग्न मंजूर नाही, आपल्याला फारकती पाहिजे असे मुलीचे वडील मुलीला म्हणत होते. मात्र मुलीचे मोहणवर प्रेम असल्याने व त्याच्या बाळाची ती आई होणार असल्याने तिने या गोष्टीला नकार दिला होता. दरम्यान , १० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता मुलीचे वडील, आई व इतर आठ ते १० जण क्रुझर घेऊन मोमिनाबादला आले. त्यांनी मोहनच्या घरात धिंगाणा घातला..मुलीचे तोंड दाबून तिला क्रूझरमध्ये टाकले..मोहनला तुझा सैराट करून टाकील अशी धमकी दिली..आणि तिथून निघून गेले..
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोहनने त्याच रात्री नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदुरबिस्वा पोलीस चौकीत तक्रार दिली..मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी मोहनने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला मदतीसाठी याचना केली..दरम्यान १७ एप्रिलला मोहनला एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला..त्यात तीने मोहनची पत्नी असल्याचे सांगितले .."हे लोक मला भुसावळला घेऊन आले आहे..मला इथे रहायचे नाही, हे येऊ देत नाही..तुम्ही पोलिसांना सांगा " असे तिने सांगितल्याचे मोहनने तक्रारीत म्हटले आहे.
त्या नंतर २२ एप्रिलला मोहनने पुन्हा नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली..मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही..दरम्यान पोलीस मोहनला घेऊन खामगावला गेले. त्याला घाटपुरी चौकात उतरवले..पोलीस मुलीच्या घरी गेले..एका तासानंतर पोलीस परतले तेव्हा मुलगी घरी नसल्याचे पोलीसांनी मोहनला सांगितले..मुलगी परतल्यानंतर पाहू असे म्हणत पोलीस निघून गेल्याचे मोहनने बुलडाणा लाइव्हला सांगितले.. मोहनने त्यानंतर अनेकदा पोलीसांकडे पुन्हा पुन्हा मदतीची याचना केली..मात्र मोहनच्या तक्रारीवरून पोलीसांनी साधा गुन्हाही दाखल केला नाही.. बायको कुठे असेल, कशी असेल या विवचंनेत असलेल्या मोहनला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.....