खळबळजनक! स्टेट बँक मॅनेजरचा खून; थर्टी फर्स्ट च्या पार्टीतून घडला की ..? मेहकर तालुक्यातील घटना

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी मुंबई येथून ग्रामीण भागात परिक्षाविधींन मॅनेजर म्हणून त्यांची हिरडव शाखेत नियुक्ती झाली होती. केवळ तीनच महिन्यापूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कामकाजात चोख आणि कायदेशीर असणारे उत्कर्ष पाटील हे कुठल्या तरी कारणामुळे विचलित होते व त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा सादर केला होता. त्यांच्या खुनाशी जुन्या घडामोडीचा संबध असावा असा अंदाजही व्यक्त केल्या जात आहे. मारेकऱ्यांनी ज्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले तो चाकु देखील घटनास्थळीच होता. सदर खून हा थर्टी फर्स्ट च्या पार्टीतून घडला की आणखी काही याबाबतचे रहस्य- दडलेले आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल. याबाबत मेहकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.