देव,देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तरुणांच्या पुढाकाराची गरज! हिंदुत्वाचे विस्मरण होऊ देऊ नका! भाग्यश्रीताई मोहिते यांचे प्रतिपादन;

अंचरवाडीत रामनवमीच्या निमित्ताने पार पडले व्याख्यान! बुलडाणा लाइव्ह चे कृष्णा सपकाळ म्हणाले, प्रभू श्रीरामांचे जीवन समाजासाठी अनुकरणीय

 
krushana
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रभू श्रीराम चंद्र देशातील प्रत्येकासाठी आदर्श आहेत. भावाने भावाशी कसे वागायचे, पतीने पत्नीशी कसे वागायचे, मुलांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन कसे करायचे याचा आदर्श रामायणात आहे. देव ,देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आता तरुणांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.असे प्रतिपादन युवा व्याख्यात्या भाग्यश्रीताई मोहिते यांनी केले. श्रीराम नवमी निमित्त अंचरवाडी येथे काल,२९ मार्चच्या रात्री त्यांचे व्याख्यान पार पडले यावेळी त्या बोलत होत्या. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या अंचरवाडी शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कव्हरेज गुरू चे संचालक, बुलडाणा लाइव्ह चे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ, स्वप्नपूर्ती स्कुलचे अध्यक्ष एकनाथ परिहार, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विष्णू घुबे,  उपसरपंच ज्योती परिहार, शिवाजी वाघ, ज्ञानेश्वर परिहार,  गजानन परिहार,संजय परिहार, सखाराम परिहार, लक्ष्मण परिहार, इंदरसिंग परिहार, वैभव शेळके, शिवराज साप्ते, अंकिता परिहार, बजरंग दलाचे विजय परिहार, विश्व हिंदू परिषदेचे शिवदास परिहार यांची उपस्थिती होती.
 

bajarangdal

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदुसूर्य महाराणा प्रताप या महापुरुषांनी धर्म रक्षणासाठी जीवन खर्ची घातले. आज धर्म, संस्कृती संकटात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वडिलांनी छत्रपती शहाजी महाराज आणि आईने जिजाऊंची भूमिका बजावणे गरजेचे आहे. रामनवमी ,शिवजयंती व महापुरुषांच्या जयंती नाचून नव्हे तर विचारांचा जागर करून साजरा करीत असल्याबद्दल त्यांनी अंचरवाडी येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
    
प्रभू श्रीरामांचे जीवन अनुकरणीय: कृष्णा सपकाळ

crowd

आपल्या देशात प्रामुख्याने भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण व प्रभू श्रीराम या तीन देवांतांचे सर्वत्र पूजन होते. भगवान शिव व भगवान श्रीकृष्ण हे देव पूजनासाठी आहेत. भगवान शंकरासारखे विष आपण पिऊ शकत नाही व भगवान श्रीकृष्णा सारख्या लीला करू शकत नाहीत. शिव आणि कृष्णाचे अनुकरण करता येणार नाही मात्र प्रभू श्रीराम अनुकरणीय आहेत. मानवत्वाकडून देवत्वाकडे जाणारा प्रवास म्हणजे प्रभू श्रीरामाचे जीवन आहे. मर्यादा पुरुषोत्तम,एक पत्नीव्रत हे श्रीरामांच्या जीवनातील पैलू आजच्या समाजासाठी अनुकरणीय असल्याचे कव्हरेज गुरू चे संचालक तथा बुलडाणा लाइव्हचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन  परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विजय परिहार, शिवदास परिहार, गणेश शिंगणे, पप्पूराजे  गायकवाड, सचिन  परिहार, गोपाल परिहार, दीपक शिंगणे, शिवशंकर शिंगणे, अविनाश परिहार, विलास परिहार, बालू राऊत, कडुबा परीहार, रवी भगवान परिहार, चेतन गाताडे यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.