"रविकांतभाऊ तुपकरांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाला आम्ही सर्वच्या सर्व हजर राहू!" सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा; ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार..
सोयाबीन सांगण्याचे विळे हातात घेऊन व दुसरा हात समोर करून शेतकरी प्रतिज्ञा करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ६ नोव्हेंबरला ,येत्या रविवारी रविकांत भाऊ तुपकरांच्या मोर्चाला आम्ही सर्वच सर्व जण हजर राहणार असल्याची प्रतिज्ञा शेतकरी करीत आहेत.
पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू ,शेतकरी म्हणून एकत्र येऊ..!
गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांनी केलेले अन्नत्याग आंदोलन देशभर गाजले होते. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तुपकर यांना चर्चेसाठी आमंत्रित करून त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे ४ हजार प्रतिक्विंटल असणाऱ्या सोयाबीनच्या दरात ८ हजार रुपये प्रति क्विंटल अशी वाढ झाली होती. त्यामुळे तुपकरांच्या आंदोलनाचे परिणाम काय होतात हे आता शेतकऱ्यांना माहीत आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून सगळ्यांनी या मोर्चाला यावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.