

BIG BREKING संघर्ष अटळ..!! रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना पोलिसांनी कोंडले! मुंबईच्या वेशीवर राडा..पोलिस पुढे जाऊ देईना...शेतकरी मागे हटेना!
Mar 19, 2025, 12:15 IST
मुंबई(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज, १९ मार्चला हे आंदोलन होणार आहे..कालपासूनच पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांना कालपासूनच बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले.मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून इतर शेतकरी ठरल्याप्रमाणे मुंबईच्या वेशीवरील नढाळ गावात मुक्कामी पोहोचले. रविकांत तुपकर परवा रात्रीपासूनच भूमिगत होते, पोलिसांची दहाच्या वर पथके तुपकर यांच्या मागावर होती.मात्र पोलिसांना चुकांडा देऊन रविकांत तुपकर आज सकाळी नढाळ गावात पोहोचले. दरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मुंबईकडे अधिकच करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी रविकांत तुपकर यांना मुक्कामाच्या स्थळीच कोंडले आहे...

शेतकऱ्यांचा मुक्काम रायगड जिल्ह्यातील मुंबईच्या वेशीवर असलेल्या नढाळ गावातील श्री क्षेत्र पंचायतन मंदिर येथे होता. मुक्काम परिसराच्या चहुबाजूनी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून ठेवला आहे. त्यामुळे परिसराच्या गेटवरच पोलीस आणि शेतकऱ्यांमधला संघर्ष आता सुरु झाला आहे.. पाचशेच्या वर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून दंगा काबू पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पोहोचले आहेत.. काहीही झाले तरी मुंबईत जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची असून आडवा आडवी केली तर रक्ताचे पाट वाहतील.. आम्ही पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या खाऊन मारायला तयार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही शहीद व्हायला तयार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माघार नाहीच अशी भूमिका रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे.....पोलिस मात्र परिसराचे गेट उघडायला तयार नाहीत..आता पुढे हे आंदोलन कोणते वळण घेणार याचे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे...