हिंदुहितासाठी मतदान हाच विकसीत भारतासाठी संकल्प! आ. श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन! अंचरवाडीत विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न! विजयराज शिंदे म्हणाले, ११ वर्षांत देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादचा फटका महायुतीला बसला. एका विशिष्ट समाजाने केवळ हिंदुत्वाचा पराभव करण्यासाठी संघटित मतदान केले, दुसरीकडे हिंदू समाज मात्र जातीपातीमध्ये विभागला गेला. मात्र हा धडा घेत विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाने देखील आपली संघटित शक्ती दाखवून दिली.  २०१४ नंतर देशात नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आले, आणि गेल्या ११ वर्षांत लाखो कोटींची विकासकामे देशात झाली. सब का साथ सबका विकास यानुसार केंद्र सरकार काम करत आहे. विकसीत भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळे देशाला विकसीत बनवण्यासाठी हिंदुहितासाठी मतदान हाच संकल्प करा असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले. अंचरवाडी येथे विकसीत भारत संकल्प सभा पार पडली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीशजी गुप्त, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य उल्हास देशपांडे, भाजपचे जिल्हा सचिव तथा संकल्प से सिद्धी अभियानाचे संयोजक चंद्रकांत बर्दे,मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघ, तालुका उपाध्यक्ष विष्णू घुबे  यांची उपस्थिती होती.
अंचरवाडी

   यावेळी पुढे बोलतांना आ. श्वेताताई म्हणाल्या की, चिखली तालुक्यात असलेले मात्र सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात असलेले २६ गावे पुन्हा एकदा चिखली मतदारसंघात असावीत अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सर्वच क्षेत्रात भरभराट होत आहे. यावेळी त्यांनी पीएम किसान सह केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही आवर्जून उल्लेख केला.

अंचरवाडी

 सर्व जगात भारताचा डंका, भारत विश्वगुरू– विजयराज शिंदे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भारताकडे वाकडा डोळा केल्यास काय होते हे पाकिस्तानसह संपूर्ण जगाला आता माहित आहे. हा भारत  "घर मे घुसके" मारने वाला भारत आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

अंचरवाडी

जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल होत आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वाला मान्य झाले आहे. भारताची वाटचाल पुन्हा एकदा विश्वगुरूच्या दिशेने होत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकरा वर्षांची कारकीर्द देशाचा गौरव वाढवणारी असल्याचे सांगितले. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हिंदू समाजाने संघटित होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे  यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्ञानेश्वर परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि राम मंदिर आंदोलनाच्या कारसेवेत सहभाग घेतलेल्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.