हिंदुहितासाठी मतदान हाच विकसीत भारतासाठी संकल्प! आ. श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन! अंचरवाडीत विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न! विजयराज शिंदे म्हणाले, ११ वर्षांत देशाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल...

यावेळी पुढे बोलतांना आ. श्वेताताई म्हणाल्या की, चिखली तालुक्यात असलेले मात्र सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात असलेले २६ गावे पुन्हा एकदा चिखली मतदारसंघात असावीत अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सर्वच क्षेत्रात भरभराट होत आहे. यावेळी त्यांनी पीएम किसान सह केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही आवर्जून उल्लेख केला.
सर्व जगात भारताचा डंका, भारत विश्वगुरू– विजयराज शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भारताकडे वाकडा डोळा केल्यास काय होते हे पाकिस्तानसह संपूर्ण जगाला आता माहित आहे. हा भारत "घर मे घुसके" मारने वाला भारत आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल होत आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वाला मान्य झाले आहे. भारताची वाटचाल पुन्हा एकदा विश्वगुरूच्या दिशेने होत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकरा वर्षांची कारकीर्द देशाचा गौरव वाढवणारी असल्याचे सांगितले. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हिंदू समाजाने संघटित होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्ञानेश्वर परिहार यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि राम मंदिर आंदोलनाच्या कारसेवेत सहभाग घेतलेल्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.