विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची शिवणी आरमाळ येथे भेट; शहीद शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट! जिल्हा शिवसेनेने नागरे कुटुंबीयांकडे सोपवला ५ लक्ष रुपयांचा कर्तव्यनिधी...

 
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज,२७ मार्चला शिवणी आरमाळ येथे भेट दिली. १५ गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान केलेले शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची ना. दानवे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने  ५ लक्ष रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील निधी नागरे कुटुंबीयांकडे ना.दानवे यांच्या हस्ते सोपवण्यात आला. आतापर्यंत अनेक नेते आले अन् पोकळ आश्वासने देऊन गेले मात्र शिवसेनेने खऱ्या अर्थाने कर्तव्यनिधी दिल्याच्या भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या..

 

advt
advt.

 यावेळी ना.दानवे यांनी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांकडून व ग्रामस्थांकडून पाणी समस्येची माहिती घेतली. यावर बोलतांना ना.दानवे म्हणाले, मराठवाड्याला, विदर्भाला पाणी मिळू नये यासाठी एक लॉबी काम करत आहे. स्व. कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर बलिदान आहे, कारण कैलास यांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही तर १४ गावांच्या सिंचनाचा  प्रश्न सुटला पाहिजे ही कैलास यांची भावना होती असे ना.दानवे म्हणाले. पाणी मिळवण्याच्या या लढ्यात शिवसेना आपल्या सोबत आहे, १० एप्रिलच्या आत संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक बैठक लावू असा शब्दही यावेळी ना.दानवे यांनी दिला. संपूर्ण महाराष्ट्र आमचा परिवार आहे, नागरे परिवार उघड्यावर पडल्याच्या भावना या ठिकाणी स्व. कैलास नागरे यांच्या भगिनी स्नेहलताईंनी व्यक्त केल्या, मात्र संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेचा परिवार आहे. नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे असेही ना. दानवे म्हणाले.

advt
advt.

कुटुंबाकडे लक्ष द्या; बहिणीची आर्त हाक

  याप्रसंगी स्वर्गीय कैलास नागरे यांचे बंधू तसेच बहीण स्नेहलताई यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. आमचा भाऊ हा आधुनिक शेतकरी होता .आज १५ दिवस झाले सगळे जण नुसते भेटी देऊन जात आहेत. मात्र कुटुंबाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही.
हा परिवार उघड्यावर पडला आहे , इकडे लक्ष द्या अशी आर्त हाक स्नेहल ताई यांनी दिली.
हाच धागा पकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी  आ. सिद्धार्थ खरात, संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख  जालिंदर बुधवत,  वसंतराव भोजने,  छगन  मेहेत्रे, सौ. जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ विजयाताई खडसन,  जिल्हा संघटक डॉ  गोपाल बच्छिरे, प्रा  डी.एस. लहाने सर, जिल्हा समन्वयक  संदीप शेळके, युवासेना जि प्र नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख दादाराव खार्डे,  महेंद्र पाटील, निंबाजी पांडव, किसनराव धोंडगे, प्रा.सिद्धेश्वर आंधळे, माजी जि प सदस्य दिलीप वाघ, शहर प्रमुख गोविंदराव झोरे, किशोर गारोळे, श्रीकांत नागरे, राजू बुधवत, तारामती जायभाये, मोहम्मद सोफियान, म्हसाजी वाघ, आकाश घोडे, रणजीत मरमठ, उल्हास भुसारे, गजानन घुगे, अक्षय ठाकरे, अजय शिवरकर, नितेश देशमुख, नागेश पऱ्हाड, गजानन डहाळके, दिलीप चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवनी अरमाळ या गावातील माता भगिनी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.