लेकीला वाईट बोलल्यास कोणता बाप एकूण घेईल? अमडापुरात झगडा झाला..एकाने अंगावर तिखट भाजी फेकली अन्....

 
 अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापुरात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाला. मुलीला शिवीगाळ करतो? म्हणून जाब विचारायला गेलेल्या बापावर एकाने तिखट भाजी फेकली..घरातील इतरांनी लोटपोट करून धक्काबुक्की केली,एकाने दगडाने मारले..प्रकरणाची तक्रार संतोष राजाराम जाधव(३२) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून  कैलास किसन जाधव, पार्वताबाई किसन जाधव, विजय किसन जाधव, किसन रामभाऊ जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  तक्रारदार संतोष राजाराम जाधव हे व्यवसायाने चालक असून ते आयशर घेऊन चार-पाच दिवस बाहेरगावी होते. २२ फेब्रुवारीला ते घरी आले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की शेजारी राहणारा विजय किसन जाधव (३८) हा मुलीला व पत्नीचे समोर विनाकारण शिवीगाळ करतो व रात्रभर आरडा ओरड करून त्रास देतो. काल,२८ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान संतोष जाधव हे विजय किसन जाधव यांच्या वडिलांना घडला प्रकार सांगण्यासाठी घरासमोर गेले."तुमचा मुलगा माझे माघारी माझी पत्नी व मुलाबाळाला व माझ्या आईला शिवीगाळ करतो" असे संतोष जाधव यांनी किसन रामभाऊ जाधव यांना सांगितले.

यावेळी रागाच्या भरात किसान जाधव यांनी काहीही ऐकून न घेता तिखट भाजी संतोष जाधव यांच्या अंगावर फेकली. त्यानंतर कैलास जाधव, पार्वताबाई जाधव, विजय जाधव या सगळ्यांनी मिळून संतोष जाधव यांना मारहाण केली. किसन जाधव याने दगड घेऊन डोक्यात मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...