अवकाळी पावसाचा कहर! विजेच्या धकक्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान – तीन जनावरे ठार! कोलवड शिवारातील घटना! लाखोंचे नुकसान....

 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काल दुपारपासून बुलडाणा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामध्ये विजेच्या कडकडाटासह वातावरणात अचानक बदल झाला. या नैसर्गिक आपत्तीत कोलवड शिवारातील एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
विवाह सोहळा
Advt. 👆

श्रीकृष्ण जाधव या शेतकऱ्याच्या बुलडाणा-अजिंठा रोडवरील शेतावर वीज कोसळून दुबती गाय, एक वासरू आणि एक वगार (म्हशीचे पिल्लू) असे तीन जनावरे जागीच मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालाठी यांनी पंचनामा केला असून, श्री. जाधव यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.