समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय! विदर्भ प्रांत संघचालक दिपकजी तामशेट्टीवार यांचे प्रतिपादन! अंचरवाडी येथे विशाल हिंदु संमेलन उत्साहात! कुटुंबव्यवस्था टिकली तर संस्कृती जिवंत राहील..
पुढे बोलतांना तामशेट्टीवार म्हणाले की, हिंदु समाजाच्या संघटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू आहे. गेल्या १०० वर्षांपासून व्यक्ती निर्माणाचे काम संघाने हाती घेतले आहे. आपल्या भारत मातेला पुनश्च एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर माणसं घडली पाहिजेत, हे कामं कुणी दुसरं येऊन करणार नाही ते आपल्यालाच करावे लागणार आहे. स्मशानात,मंदिरात सर्वांना प्रवेश. कोणताही भेदभाव न करता जलसाठा सर्वांसाठी एक अशी समरसता प्रत्यक्ष व्यवहारात जगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. एकत्र कुटुंब पद्धती , कौटुंबिक संस्कार महत्वाचे आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, नाती टिकली तर संस्कृती जिवंत राहील असेही तामशेट्टीवार म्हणाले. आपले गाव स्वच्छ, देश स्वच्छ रहावा यासाठी पर्यावरण पूरक जीवन पद्धती आवश्यक आहे,प्लास्टिकचा वापर टाळावा. झाडांचे संगोपन करावे, पाण्याचे संवर्धन करावे असेही ते म्हणाले. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करावा जेणेकरून आपल्या माणसांना रोजगार उपलब्ध होईल असेही ते म्हणाले. याशिवाय आपल्या हक्कांसाठी लढताना देशाप्रती आपली कर्तव्य काय आहेत याचेही भान असावे. संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान याचा सन्मान ठेवावा असे दिपक तामशेट्टीवार म्हणाले.