शेतकऱ्यांचे विज बिल माफ झालेच पाहिजे, उबाठा शिवसेनेची बुलढाण्यात निदर्शने...! विद्युत पुरवठ्याबाबतच्या समस्या गांभीर्याने घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन : जालिंदर बुधवत यांचा इशारा...
Updated: Jun 10, 2025, 15:05 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी आणि शेती बाबतच्या धोरणावर राज्य शासनाची उदासीनता कायम आहे. महावितरणाने तर शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शहरी भागातही नागरिक वीज खोळंब्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा बाबतच्या समस्या गांभीर्याने घ्या, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे . शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसह अन्य शेतीहिताच्या मागण्यासंदर्भात शिवसेनेने जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर आज बुलढाण्यात निदर्शने केली.
अधीक्षक अभियंता , महावितरण (बुलढाणा) यांची आज १० जून २०२५ रोजी भेट घेऊन याबाबत मागणी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले .अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे शहरी तथा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सध्या विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हा विद्युत पुरवठा सुरळीत करावा. सोबतच सौर ऊर्जा पंपाची मागणी नोंदवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना संबंधित रकमेचा भरणा करून झाल्यावर सहा महिने उलटले तरी अद्यापही सौर ऊर्जा पंपाचे कनेक्शन मिळालेले नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये व परिसरातील पंचक्रोशीमध्ये कृषी डिप्यांवर असलेला ओव्हरलोड कमी करणे आवश्यक आहे. यासाठी ३२ केव्ही सबस्टेशन नव्याने निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन आराखडा देखील मंजूर करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने गुम्मी (तालुका बुलढाणा) आणि धामणगाव बढे (तालुका मोताळा )यासह जिल्ह्यातील प्रस्तावित अन्य गावांचा समावेश आहे. या कृती आराखड्याची अमलबजावणी करावी. महत्त्वाचे म्हणजे थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र अलीकडे तीच वीज बिल अवरेज अर्थात सरासरी लावून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे थकीत विज बिल माफ करण्यात यावेत.
अलीकडे झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने तसेच वादळ वाऱ्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत खांबे हे क्षतिग्रस्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अपघात होऊन मनुष्यहानी किंवा पशुहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित दुरुस्तीची कामे तात्काळ मार्गी लावून विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाभर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जालिंदर बुधवत (जिल्हाप्रमुख शिवसेना) यांनी दिला आहे. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.चंदाताई बढे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने सर, उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, माजी सभापती सुधाकर आघाव, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजुभाऊ इंगळे, विजय इतवारे, अशोक मामा गव्हाणे, एडवोकेट सुमित सरदार, रवि राजपूत, गोविंद डांगर, गजानन उबरहंडे, सुनील गवते, समाधान बुधवत, अनिकेत गवळी, मोहम्मद सोफियान, रफिक शेठ, संजय शिंदे, संजय गवळी, भगवान नरोटे रंगनाथ नप्ते कृष्णा वाघ मुजफ्फर शेख,आशिष थोरगण, मोहित राजपूत, संजय दर्डा, हरिभाऊ सिनकर, साहेबराव इतवारे, मुरली जेऊघाले, दीपक पिंपळे, मधुकर महाले, बबन खरे, संतोष नप्ते, गणेश रिंढे, निंबाजी काळवाघे, रमेश चवंड, राजू बोरसे, गुलाबराव व्यवहारे, संभाजी आघाव,अमोल जुमडे, लताताई टेकाळे, किरण पाटील, चांगदेव जाधव, प्रल्हाद काकडे, संजय चोरमुले, सोमनाथ शिरसाट, पंजाबराव गवई, संदीप जाधव, श्रावण बोरकर, प्रकाश गवळी यांचे सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.