कोसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! सावत्रा येथे पेनटाकळी चा कॅनॉल फुटला; २० ते २५ एकर शेत जमीन खरडून गेली..! शेतकरी म्हणतात, पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार...

 
 जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यात २५ जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी झाली.. एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस झाला की नदी झाले एक झाले.. नुकत्याच पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या.. शेतात कमरेपर्यंत पाणी साचले.. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा ० ते ११ किमी मधील कालवा फुटल्याने सावत्रा निकस येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जवळपास २० ते २५ एकर जमिनी पूर्णपणे खरडून गेली आहे..

Janefal

   शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा काल झालेल्या पावसामुळे ओसंडून गेला. ० ते ११ किमी मधील पाचल्याकडे जाणारे आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला.
कालवा ओव्हर फ्लो झाला, सोनार गव्हाण शिवारात कालव्याची मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. शेतकऱ्यांनी आउटलेट गेट उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र गेटला वेल्डिंग केलेली असल्याने गेट उघडता आले नाही. या संबंधात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळवले मात्र कुणीही मदतीसाठी धावले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे अरुण प्रल्हाद निकस,श्रीराम काशिनाथ निकस,शिवाजी तुकाराम निकस,भगवत तुकाराम निकस,वैशाली गजानन निकस,शिवाजी वामन निकस,विलास कडूबा निकस,गंगाधर निंबाजी निकस ,
अनंतराव हरिनारायण निकस ,प्रकाश हरिनारायण निकस, विश्वनाथ हरिनारायण निकस,मदन निंबाजी निकस ,
गजानन निंबाजी निकष, अमोल भागवत निकस आधी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनीने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.