पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढतेय! विदर्भ मराठवाड्यात स्थिती गंभीर....! बुलढाणा जिल्ह्यात २७% क्षेत्रावरच पेरण्या

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "तो" वेळेवर येणार म्हणून सगळीकडे चर्चा सुरू होती. चक्क उन्हाळ्यात त्याने हजेरी लावली आणि लग्नाची दाणा दान उडवली. पण पेरणीच्या वेळेला मात्र तो रुसून बसला असल्याचे दिसत आहे. अर्थात ही चर्चा सगळी सुरू आहे ती पावसाबद्दल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून नेमका वेळ दाखल झालेला असला तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती गंभीरच आहे. त्यामुळे खरीप हंगाम लांबीवर पडला आहे एकटा बुलढाणा जिल्ह्यात २७% पेरण्या झाल्याची नोंद आहे विदर्भाची स्थिती काहीशी सारखीच आहे.

निसर्गाचा असमतोल शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. आधीच भाव मंदीने शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही त्यातच भाव फरक मारक ठरला आहे. नव्या हंगामाला सामोरे जात असताना उत्पादनाच्या नव्या आशा मायबाप शेतकऱ्यांना लागून आहेत. मात्र वेळेवर दाखल झालेला मान्सून अशी चित्र असले तरीही बुलढाणा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सोडली तर पेरणी योग्य पाऊस सर्व दूर झालेला नसल्याचे वास्तव आहे. राज्यात कोकण पुणे आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झाला आहे परंतु दुसरीकडे विदर्भाने मराठवाड्यातील स्थिती गंभीर आहे. नागपूर अमरावती या दोन विभागांमध्ये जून महिन्यात संपत आला तरी १०० मिलिमीटर देखील पावसाची नोंद झालेली नाही. यावरूनच पेरण्याची स्थिती एकंदरीत लक्षात येते. खरीप हंगाम लांबत असल्याने शेतकरी वर्गात चिंताभय आहे. पेरण्याचा विचार केला तर पश्चिम विदर्भामध्ये सर्वाधिक पेरणी ही वाशिम जिल्ह्यात ( ३२.८ टक्के) झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले काही भागात शेतकऱ्यांनी जमिनीची पोल पाहून पेरण्या केल्या. मात्र सर्व दूर जोरदार पाऊस झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यात २७% अकोला जिल्ह्यात २८ आणि अमरावती जिल्ह्यात २२ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात देखील २८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. ही आकडेवारी पाहिली तर ७० ते ७५% पेरण्या अद्यापही शिल्लक आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात सरासरीच्या ८% पडला पाऊस! 
होय हे खर आहे! बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८ टक्केच पाऊस पडला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ७६१.६ मिमी इतकी असते. त्या तुलनेत आजपर्यंत केवळ ५४.५ मी मी इतका पाऊस यावर्षी झाला आहे. ही टक्केवारी ७.९३ इतकी आहे. या ताई सर्वाधिक पाऊस हा जळव राजा तालुक्यात १४.१५ टक्के, मलकापूर तालुक्यात १३ टक्के, त्या खालोखाल नांदुरा तालुक्यात १०.९१ टक्के पाऊस झाला आहे. इतर दहा तालुक्यांना पावसाच्या सरासरीत दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही.