कालव्यातील पाणी पाझरून नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा; वसंतंगर, भरोसा गावचे शेतकरी परेशान! सिंचनाखालील क्षेत्राचे उंबरठा उत्पन्न कमी दाखविण्यासह नुकसानाचे मूल्यांकनही तोकडे!

शेतकऱ्यांच्या नुकसानीस खडकपुर्णा विभागच जबाबदार! विनायक सरनाईक यांचा आरोप 

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ वरील कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कालव्याचे पाणी पाझरून वसंतनगर आणि भरोसा शिवारातील तब्बल ३१५ एकरवरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, या नुकसानाचे मूल्यांकन करताना शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या पाटाखालील वहिवाटीच्या जमिनींना कोरडवाहू क्षेत्रापेक्षाही कमी उंबरठा उत्पन्न दर्शविण्यात आले, तसेच १०० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे मूल्यांकनही अत्यंत तोकडे दर्शविण्यात आले आहे. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम संबंधित विभागाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणी विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व खडकपुर्णा चे अधिकारी यांची भेट घेवून चांगलेच धारेवर धरले होते.या संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी दि. २ एप्रिल रोजी खडकपूर्णा कालवे उपविभागीय अभियंत्याकडे शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या मूल्यांकनामुळे झालेल्या अन्यायाची दखल घ्यावी.वाढीव नुकसान भरपाई रक्कम देण्यात यावी,निकृष्ट दर्जाच्या कालव्याच्या कामामुळे भविष्यातही नुकसान होऊ शकते,त्यामुळे निकृष्ट कालव्याची पाहणी शेतकऱ्यांसमवेत करुन संपूर्ण अहवाल शासनास पाठवावा. कालव्याचे नव्याने बांधकाम करावे. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करून कठोर कारवाई करावी,आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन झाल्याने शेतकरी संतप्त झाले असल्याचे बगावयास मिळाले यावेळी विलास राऊत,देविदास जाधव,पत्रकार उध्दव थुट्टे,शेषराव जाधव,डीगांबर राठोड,शे बन्ना शे कंदीर,बाबुराव चव्हाण, संतोष शेटे,शिवाजी सुखदेव थुट्टे,किसन आटोळे, अंकुश राठोड,उत्तमराव राठोड,भाष्कर जाधव,मोहण चव्हाण,जीवन गुलाब चव्हाण, यांच्यासह शेतकरी उपस्थित
शेतकऱ्यांना मिळणार तुटपुंजी नूकसान भरपाई....
कालवा क्र. ३ च्या निकृष्ट कामामुळे वसंतनगर आणि भरोसा शिवारात ३१५ एकरांवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हे खुद्द खडकपूर्णा कालवे उपविभागाने मान्य केले आहे. त्यानुसार पंचनामा करण्यात आला. मात्र, कृषी विभागाने नुकसानभरपाईसाठी केवळ ४ लाख ३५ हजार ९३८ रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तर मुल्यांकन वेतीरीक्त नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात यावी,२०२३चे मुल्यांकन बगता उत्पन्न वाढणे अपेक्षित असतांना कमी झाल्याने कुठेतरी प्रशासनाकडून रक्कम टाकतांना चुक झाली असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत आकडे वारी तपासून वाढिव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
तुटपुंजी मदत दिल्यापेक्षा कायमस्वरुपी उपाययोजना करा-विनायक सरनाईक 
खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक १ ते ४ मधील निकृष्ट कामे, भ्रष्टाचार आणि पाणी पाझरून झालेल्या नुकसान यामुळे गंभीर प्रश्न विनायक सरनाईक यांनी उचलून धरला होता.सरनाईक यांच्या तक्रारीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, कालवा क्रमांक ३ वरील वसंतनगर व भरोसा येथील ३१५ एकरवरील नुकसानीचा अहवाल खडकपूर्णा कालवे उपविभाग क्रमांक २, यांनी कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवला मात्र आता नुकसान होवून देखील मुल्याकनामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तुटपुंजी मिळणार असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करुण कालव्याचे नव्याने बांधकाम व्हावे अशी मागणी विनायक सरनाईक यांनी खडकपुर्णा विभागाकडे केली आहे.या नुकसानीस खडकपुर्णा विभागच जबाबदार असून वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसह तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाटाचे पाणी वाहत्या भागात मुल्यांकन कमी निघल्याने आचर्य 
भरोसा वसंतगर भागामध्ये पाणी वाहते आहे.शेती सुद्धा उत्तम प्रकारे केली जाते असे असतांना इतर महसुल मंडळात उबरठा उत्पन्न जास्तीचे दाखवले जाते मात्र पाटाचे पाणी वाहणाऱ्यां भागातच उत्पन्न कमी दाखवले गेले असल्याने नूकसान भरपाई कमी मिळणार असुन याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.ऐवढे होवूनही हि समस्या कालवा झाल्यापासून ची असूनही खडकपुर्णा विभाग निकृष्ट काम करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याने आचर्य व्यक्त केले जात आहे.
माजी जि प सदस्य शेतकरी नेते एकनाथ पाटलांनीही साधला तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संवाद...
या प्रकरणी एकनाथ पाटील यांनी भ्रमणध्वनी व्दारे तालुका कृषी अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली सर्व कागदपत्रे बगीतल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे की घट असा सवाल त्यांनी उपस्थित केला असुन या महसुल मंडळातील उंबरठा उत्पन्न सरासरी व मुल्याकनामधील आकडेवारी व भाव तपासून शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी एकनाथ थुट्टे यांनी केली आहे.