समृद्धीचे अंडरपास शेतकऱ्यांसाठी ठरताहेत डाेकेदुखी, सततच्या पावसाने चिखलातून काढावी लागते वाट;
डाेणगाव परिसरातील चित्र, उपाय याेजना करण्याची शेतकऱ्यांकडून हाेतेय मागणी!
महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा वहिवाट रस्ते नामशेष झाले, तर दुसरीकडे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक मार्ग बंद झाले. यामुळे समृद्धी
महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. शेतीमधील गाळ पाण्यासोबत वाहून अंडरपास रस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे. या बोगद्याखाली दिवसा अंधार पसरलेला असतो.
सध्या चिखलामुळे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्र नेता येत नाही. चिखल, पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, डाेणगाव जिल्ह्यातून ज्या ज्या गावातून समद्धी महामार्ग गेला आहे तेथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यावर तातडने उपाय याेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.