बावनकुळे म्‍हणाले, झारखंड काय… मी रांचीलाही कधी गेलो नाही!

पुणे ः झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही नेत्यांचा हात आहे. झारखंड पोलिसांनी बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष पोलिस पथक त्याचा तपास करीत असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर प्रथमच बावनकुळे यांनी माैन सोडले. झारखंड काय, मी रांचीलाही कधी गेलो नाही… असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे …
 

पुणे ः झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही नेत्यांचा हात आहे. झारखंड पोलिसांनी बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष पोलिस पथक त्याचा तपास करीत असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर प्रथमच बावनकुळे यांनी माैन सोडले. झारखंड काय, मी रांचीलाही कधी गेलो नाही… असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी अगोदर पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांच्यावर आरोप केला होता. त्यांनतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे याच्यांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. सरकार पाडण्याएवढा मी मोठा राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, असे ते म्हणाले. सरकार पाडण्याबाबतचं हे संपूर्ण प्रकरण हास्यास्पद आहे. मी कधी रांची पाहिली नाही. तिथल्या एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही. मी महाराष्ट्रातील भाजपचा छोटा कार्यकर्ता आहे. सचिव आहे. हे सगळं कपोलकल्पित आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं.