जलंबजवळ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू – पुढील दोन महिने मार्ग बंद, वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली! "असा" आहे पर्यायी मार्ग...

 
 बुलढाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जलंब गावाजवळील चांगेफळ-भेंडवळ-भास्तन-माटरगांव-जलंब-खामगाव या राज्य मार्ग क्र. २२२ वरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम जोरात सुरू असून, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरील वाहतूक पुढील दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
 
रस्त्यालगत पर्यायी शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनांसाठी सुरक्षित मार्ग देणे शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी खामगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ - लांजुड - खोलखेड मार्गावरील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ५० व ७ चा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.