अन्यथा उपोषण करू! अंचरवाडीच्या शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा! १० जूनपासून लाईट नाही, तरी अजून दुरुस्ती नाही...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंचरवाडीच्या शेतकऱ्यांनी महावितरण ला उपोषणाचा इशारा दिला आहे. १० जून पासून वादळामुळे ६ इलेक्ट्रिक पोल पडलेत, त्याची अद्याप दुरुस्ती नाही. त्यामुळे लाईट नाही, शेतकरी परेशान आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अंचरवाडीच्या खटकाळी भागातील हा प्रकार आहे..
१० जूनला वादळामुळे ६ खंबे पडले होते. तेव्हापासून वीज पुरवठा बंद आहे. परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही..शिवाय जनावरांच्या पाण्याची देखील सोय नाही. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महावितरणच्या देऊळगावराजा उपविभागीय कार्यालयाकडे करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख शिवा चव्हाण यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.