BIG NEWS राज्यात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटणार! फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तूपकरांचे उद्यापासून अन्नत्याग आंदोलन! म्हणाले, जीव गेला तरी माघार नाही;
राज्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविकांत तुपकर यांनी फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केल्यामुळे राज्य सरकार सह शेतकऱ्यांचेही लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची स्टाईल पाहता पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. उद्या ,१५ जूनला सकाळी ९ वाजता बुलडाणा येथील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत.
जिल्हासह राज्यभरातील शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात येण्याची चिन्हे पाहता आंदोलन तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित केला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे. राज्य शासनाने वेळीच आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी योजनेच्या अटी शिथिल न केल्यास रविकांत तुपकर यांच्या या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटू शकतो...