१४ महिन्यात ८२ बालविवाह रोखले! १०९८ हा टोल फ्री क्रमांक ध्यानात ठेवा..

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यामध्ये गेल्या  14 महिन्यात 82 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह केलेल्या 7 प्रकरणामध्ये 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डीघुळे यांनी दिली.जिल्ह्यात कुठे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

बालविवाह संदर्भात शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र तरी देखील अजूनही बालविवाहाच्या घटना समाजामध्ये सातत्याने घडत असल्याच समोर येत आहे. हेच बालविवाह रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन गेल्या वर्षभरापासून ॲक्शन मोडर असल्याच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या 14 महिन्यात 88 बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्प लाईनला यश आले आहे. तर बालविवाह लावलेल्या 7 प्रकरणामध्ये 16 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात कुठे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सुज्ञ नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.